09-May-2020 : इस्लामपूर / प्रतिनिधी
लग्न ठरूनही तारीख निश्चित होत नसल्याने चिकुर्डे (ता. वाळवा) येथील २० वर्षीय तरुणी वैशाली शिवराम पाटील हिने शुक्रवारी (दि. ८) दुपारी दोनच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेची नोंद कुरळप पोलीस ठाण्यात झाली आहे.
वाळवा तालुक्यातील चिकुर्डे येथील टाकळी वसाहतमधील वैशाली शिवराम पाटील हिचे एक वर्षांपूर्वी लग्न ठरले होते. पण तारीख निश्चित होत नसल्याच्या नैराश्येतून शुक्रवारी दुपारी २ वाजण्याच्या दरम्यान राहत्या घरी कोणी नसल्याचे पाहून घरातील लोखंडी तुळईला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
याची माहिती कुरळप पोलिसांना मिळताच घटनास्थळी पंचनामा करून कुरळप प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन केले. याबाबतची फिर्याद दीपक पाटील याने दिली आहे.
|